InterviewSolution
| 1. |
Essay on badalta bharat in marathi |
|
Answer» समाजजीवनाच्या एखाद्या क्षेत्रात होणारा बदल इतका व्यापक असतो, की जीवनाच्या इतर क्षेत्रांवर त्याचा आपोआप परिणाम होतो, गेल्या दशकात जागतिकीकरण या संबोधनाने ओळखल्या जाणा-या मुख्यत: आर्थिक क्षेत्रातील बदलामुळे राजकारणापासून समाजकारणापर्यंत जीवनाची विविध क्षेत्रे झपाटयाने बदलत चालली आहेत. हे बदल किती दूरगामी परिणाम करणारे आहेत, हे अर्थशास्त्राचे अभ्यासक वेगवेगळया आकडेवारीच्या साह्याने आपल्याला सांगत असतातच, पंरतु समाजजीवनात घडणा-या अशा बदलाचे स्वरूप मानवी जीवनात घडणाऱ्या अशा बदलातून, लोकांच्या मानसिकतेच्या बदलातून जेवढे ठळकपणे कळू शकते तेवढे रूक्ष आकडेवारीने लक्षात येत नाही. एक संवेदनाक्षम नागरिक म्हणून समाजजीवनातील या परिवर्तनाचा मागोवा घेण्यासाठी ‘अंतर्नाद’चे संपादक भानू काळे यांनी देशभर भ्रमंती केली आणि आपला पाहिलेला ‘बदलता भारत’ काही लेखांच्या माध्यमातून टिपला. त्या लेखांचा संग्रह ‘मौज’ने प्रसिध्द केला आहे. सकृतदर्शनी केवळ आर्थिक वाटणारे हे बदल समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारे आहेत, याची त्यांना जाणीव आहे, म्हणून त्यांनी आपल्या अवलोकनाचा परीघ संकुचित केलेला नाही. |
|