1.

मुगल आदिलशाह निजाम शहा इंग्लराज पोर्तुगीज भरताचे कोन होटे​

Answer»

पंधराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण हिंदुस्थानात स्थापन झालेली एक मुसलमानी राजसत्ता. ðबहमनी सत्ता निष्प्रभ झाल्याचा फायदा घेऊन त्याच राज्यातील विजापूरचा सुभेदार यूसुफ आदिलखान १४८९ मध्ये स्वतंत्र झाला. तोच आदिलशाही घराण्याचा संस्थापक होय. सुमारे दोनशे वर्षे या घराण्याची सत्ता दक्षिणेत होती. या काळात युसूफ आदिलखान (१४८९-१५१०), इस्माइल आदिलशहा (१५१०-१५३५), इब्राहिम आदिलशहा (१५३५-१५५७), पहिला अली आदिलशहा (१५५७-१५८०), दुसरा इब्राहिम आदिलशहा (१५८०-१६२७), मुहंमद आदिलशहा (१६२७-१६५६), दुसरा अली आदिलशहा (१६५६-१६७२) आणि दुसरा शिकंदर आदिलशहा (१६७२-१६८६) असे सुलतान होऊन गेले.यूसुफ आदिलखान मुत्सद्दी, कर्तबगार व सहिष्णू होता. इस्माइल आदिलशहाच्या कारकीर्दीत अनेक लढाया व कटकारस्थाने झाली. या दोन्ही सुलतानांची कारकीर्द आदिलशाही सत्ता सुस्थिर करण्यात गेली. यासाठी त्यांना बहमनी राज्यातील अमीर बरिदशी झगडावे लागले. यूसूफने विजयानगरच्या राजाशी तह करून बरिदचा पराभव केला. यानंतर विजयानगरच्या राजाने केलेल्या स्वाऱ्या यूसुफने परतविल्या.यूसुफकडून १५१० मध्ये पोर्तुगीजांनी गोवे काबीज करून कुडाळपासून चित्ताकूलपर्यंतचा प्रदेश जिंकला. इस्माइल आदिलशहाने १५२४ मध्ये पोर्तुगीजांकडून साष्टी, बारदेश आणि त्याभोवतालचा प्रदेश हस्तगत केला. इब्राहिम व पहिला अली आदिलशहा यांचा पोर्तुगीजांशी संघर्ष निर्माण झाला. इब्राहिमचा प्रतिस्पर्धी शहाजादा अब्दुल्ला हा १५४३ मध्ये पोर्तुगीजांच्या आश्रयास गेला. पोर्तुगीजांनी त्यास मदत करू नये, म्हणून इब्राहिमने साष्टी व बारदेश हे प्रांत पोर्तुगीजांना बहाल केले. १५७०-१५७१ मध्ये अली आदिलशहाने मुर्तजा निजामशहा व कालिकतचा सामुरी (झामोरीन) यांच्याशी हातमिळवणी करून गोवा व चौल घेण्याचा प्रयत्‍न केला. पण त्यात त्यांना यश मिळाले नाही.आदिलशाही सुलतानांना निजामशहा, कुतुबशहा, बरिदशहा व विजयानगरची सत्ता यांच्याशी सतत झगडावे लागले. विजयानगरच्या राजाने जिंकून घेतलेल रायचूर, मुद्‍गल हे प्रांत इस्माइलने अनेकदा प्रयत्‍न करून जिंकून घेतले. अमीर बरिदने निजामशहाच्या मदतीने विजापूर घेण्याचा प्रयत्‍न केला होता, परंतु इस्माइल व इब्राहिम आदिलशहांनी त्यांचा पराभव करून सोलापूर जिंकून घेतले. अमीर बरिद मरण पावल्यावर आदिलशाही सुलतानांच्या मागची कटकट कमी झाली.आदिलशाही आणि ð निजामशाही सुलतानांमध्ये १५३१ ते १५९४ पर्यंत राज्यवृद्धीसाठी संघर्ष चालू होता. सोलापूरचा किल्ला व त्याखालील साडेपाच परगणे हे त्यांच्यातील युद्धाचे मुख्य कारण होते. निजामशहाने विजयानगरचा रामराजा आणि कुतुबीकुत सुलतान यांच्या मदतीने १५४३ मध्ये विजापूरच्या प्रदेशावर स्वारी केली. तेव्हा आदिलशाही प्रधान आसदखान याने विजयानगरच्या राजाशी तह केला. निजामशहाला सोलापूर महाल दिला व कुतुबशहाशी लढून त्याचा पराभव केला. बुऱ्हाण निजामशहाला सोलापूर परगणा मिळूनही तो तृप्त नव्हता. आसदखान मरण पावल्यावर, १५४९ मध्ये निजामशहाने विजयानगरच्या रामराजाशी तह करून विजापूरच्या प्रदेशावर स्वाऱ्या केल्या. त्याने रामराजासाठी रायचूर व मुद्‍गल आणि स्वतःसाठी कल्याणी व सोलापूर अशी ठाणी जिंकून घेतली.अली आदिलशहाने विजयानगरच्या रामराजाची मदत घेऊन निजामशहाने केलेल्या स्वाऱ्या परतविल्या. याचा फायदा विजयानगरच्या राज्याला मिळाला. त्या राज्याची सत्ता वाढली. त्यामुळे त्या राज्यात व आदिलशाही सत्तेत वितुष्ट आले. थोड्याच दिवसांत निजामशहा व आदिलशहा हे एकमेकांतील वैर विसरले. स्‍नेहसंबंध दृढ करण्यासाठी १५६४ मध्ये हुसेन निजामशहाने आपली मुलगी ðचांदबिबी व सोलापूरचा किल्ला पहिला अली आदिलशहा याला दिला. यानंतर अली आदिलशहा, निजामशहा, इब्राहिम कुतुबशहा आणि अली बरिद यांनी एकत्र होऊन १५६५ मध्ये तालिकोटच्या लढाईत विजयानगरचे राज्य नष्ट केले.निजामशहा व आदिलशहा यांच्यातील मैत्री फार काळ टिकू शकली नाही. त्यांच्यात पुन्हा स्पर्धा सुरू झाली. मुर्तजा निजामशहा अल्पवयी असल्याचा फायदा घेऊन अली आदिलशहाने निजामशहाला मिळालेला पूर्वीच्या विजयानगर राज्यातील प्रदेश जिंकून घेतला. यावेळी विजापूर राज्याची सीमा उत्तरेस नीरा, अक्कलकोट, नळदूर्ग, कल्याणपर्यंत, (काही अपवाद सोडून) पश्चिमेस बाणकोटच्या दक्षिणेकडील समुद्र किनाऱ्यापर्यंत, दक्षिणेस तुंगभद्रा नदीपर्यंत आणि पूर्वेस रायचूर, यादगीर, बिदरपर्यंत होती.अली आदिलशहाचा १५८० मध्ये एका खोजाने खून केल्यानंतर त्याचा पुतण्या दुसरा इब्राहिम आदिलशहा गादीवर आला. तो अल्पवयी असल्याने चांदबिबी व दिवाण कारभार पाहू लागले. राज्यकारभार बळकावण्याच्या महत्त्वाकांक्षेने चांदबिबीला कैद करण्यापर्यंत दिवाणाची मजल गेली होती. थोड्याच दिवसांत तिची सुटका करण्यात आली. विजापूर दरबारात उत्तरी व दक्षिणी लोकांत सत्तास्पर्धी सुरू झाली. याचा फायदा घेऊन मुर्तजा निजामशहाने कधी एकट्याने, तर कधी कुतुबशहाच्या मदतीने विजापूरवर स्वाऱ्या केल्या. इब्राहिम आदिलशहाची बहीण मुर्तजा निजामशहाच्या मुलाला देऊन सोयरिकीच्या संबंधांनी या दोन्ही राज्यांत पुन्हा मैत्रीचे संबंध जोडले गेले; पण हे मैत्रीचे संबंध फार काळ टिकू शकले नाहीत. वयात येताच इब्राहिमने सर्व राज्यकारभार आपल्या हातात घेऊन मलनाड राजाकडून खंडणी वसूल केली. त्याने निजामशाहीविरुद्ध यशस्वीपणे प्रतिकार केला असला, तरी मलिकंबरबरोबर झालेल्या लढाईत त्याला पराजय पतकरावा लागला. १६१९ मध्ये इब्राहिमने बरिदशाहीवर स्वारी करून, तिचा सर्व मुलूख जिंकून आपल्या राज्यास जोडला.आदिलशाही सुलतानांनी १५९४ ते १६३६ पर्यंतच्या काळात निजामशाहीशी वैर विसरून त्या राज्यावर आलेल्या मोगलांच्या आक्रमणाविरुद्ध चांदबिबीला व निजामशाही तारण्यासाठी झटणाऱ्या ð शहाजीला सर्व तऱ्हेचे साहाय्य दिले, निजामशाही बुडाल्यानंतर (१६३७) शहाजी आदिलशहाकडे नोकरीला राहिला. आदिलशहाने त्याला कर्नाटकात काही परगणे व महाराष्ट्रात इंदापूर, पुणे, बारामती ही परगणे जहागीर म्हणून दिले.. #queen♥️



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions