| 1. |
Pani naste tar in marathi essay writing |
|
Answer» ■■पाणी नसते तर,...!!■■ पाणी नसते तर, आपले जीवन संकटात येईल.आपण पाणी पीतो, तेव्हा आपल्याला ऊर्जा मिळते,आपल्या शरीरातील वेगवेगळ्या क्रिया सुरळीत पार पडतात.पाणी नसते तर, आपल्या शरीरावर वाईट परिणाम होईल. पाणी नसते तर,आपण कपड़े व भांडी कसे धुणार?जेवण कसे बनवणार? अंघोळ कशी करणार?पाणी नसते तर, जनावरांना,पक्ष्यांना खूप समस्या होतील.त्यांना जीवन जगणे खूप कठीण होईल. पाणी नसते तर, वनस्पति व झाड जगू शकणार नाही.मग आपल्याला खाण्यासाठी भाज्या व धान्य कुठून मिळणार?कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी बनवण्यासाठी पाणी वापरले जाते. पाणी नसते तर, कारखान्यांमध्ये विविध उत्पादने कसे बनणार? पाण्याशिवाय आपण फक्त तीन ते चार दिवस जगू शकतो.'पाणी हेच जीवन आहे', म्हणून 'पाणी नसते तर', हा विचारच आपण नाही केला पाहिजे. |
|