1.

Surya ugavala nahi tar essay in Marathishort​

Answer»

सूर्य उगवला नाही तर....

सूर्या शिवाय सृष्टिची कल्पना संभवच नाही आहे. जीवनाचे

दूसरे नाव आहे सूर्य. जर हा सूर्यच उगवला नाही तर. तर सर्व सृष्टीच नष्ट होणार. सगळी

कडे अंधार, काळोख पसरणार. कुणालाही कामावर जाण्याचा उत्साहच नाही राहणार.

सूर्याच्या प्रकाशातच झाडे प्रकाश-संश्लेषणाद्वारा प्राथमिक अन्न तयार करतात. आणि जीवांना

आवश्यक असलेला प्राण वायू सोडतात. म्हणजे जीवांना आवश्यक असलेला प्राणवायु (ऑक्यीजन)

हे सुद्धा अप्रत्यक्षरित्या सूर्यच पुरवितो. जर सूर्यच उगवला नाही तर वनस्पती अन्न

तयार करणार नाहीत. तर मग सजीव काय खाणार, श्वास कसा घेणार. पाऊस देखील होणार नाही

कारण बाष्पी करण होण्याकरिता देखील मदत करतो तो सूर्यच.

सूर्य नाही म्हणजे सकाळ

होणार नाही, कोंबडा आवरणार नाही, पशु-पक्षांची किलबिलाट ऐकायला येणार नाही.

संपूर्ण पृथ्वीवर हाहाकार उडेल.   

म्हणूनच सूर्य उगवला नाही तर ही कल्पना देखील करवत नाही. जीवनाचे दूसरे नाव आहे सूर्य.

please MARK as BRAINLIEST,



Discussion

No Comment Found