| 1. |
सूर्य सुट्टीवर गेला तर निबंध मराठी |
|
Answer» गुरुवार, ३० जानेवारी, २०२० सूर्य संपावर गेला तर मराठी निबंध | Surya Sampavar Gela TAR Essay In Marathiनिबंध 1सूर्य संपावर गेला तर मराठी निबंध | Surya Sampavar Gela Tar Essay In MARATHI : आमच्या एका विज्ञाननिष्ठ आजींनी त्यांच्या अंगणात सूर्यचूल केली होती. ती पाहण्यासाठी आम्ही आजींकडे गेलो होतो. आजींनी आम्हांला चुलीचे प्रात्यक्षिक दाखविले आणि मग आजी म्हणाल्या, “आता गॅसवाल्यांनी संप केला तरी मला चिंता नाही." आजीचं वाक्य संपलं नाही, तोच चिमुरडी अस्मिता म्हणाली, “आणि आजी, सूर्यानेच संप केला तर ग-?" सूर्याने संप केला तर आजींची सूर्यचूल पेटणार नाही हे तर खरेच! पण सूर्याने संप केला तरमात्र आळशी माणसाला काही काळ बरं वाटेल. कारण सूर्य आकाशात येणार नाही म्हणजे दिवसच उगवणार नाही. रात्रीचे राज्य संपणारच नाही. मनसोक्त लोळत पडावे. पण अहो लोळणार तरी किती! आणि लोळत पडलो तरी भूक लागायची ती लागणारच. म्हणजे उठायला हे हवेच. दिवे लावून कामाला सुरुवात केली, तरी असे किती वेळ दिवे लावणार? शाळा, महाविदयालये, कचेऱ्या, घरीदारी सगळीकडे सतत विजेचा वापर केल्याने लवकरच विजेचा तुटवडा भासू लागेल. मग सरकारपूढे मोठा प्रश्न पडेल.Explanation:PLEASE MARK ME AS THE BRAINLIEST!@@@ |
|