1.

वृक्षारोपण,वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, झाडे लावा झाडे जगवा...

Answer»

ANSWER:

झाडे मानवजातीसाठी निसर्गाची अनमोल भेट आहेत. ते आपल्याला श्वास घेण्यास ऑक्सिजन व उन्हाळ्यात सावली प्रदान करतात. वातावरण थंड ठेवतात.झाडाचा प्रत्येक भाग कशा ना कशा प्रकारे तरी उपयुक्त ठरतो.

पण औद्योगिकीकरण आणि निवाऱ्याकारिता जागा वाढवण्यासाठी झाडे तोडली जात आहेत.वृक्षतोडीमुळे एके काळी दिसणारे जंगल आता नाहिसे झाले आहे.याच्या परिणामस्वरूप वातवरणात बदल होत आहे,जागतिक तापमान वाढ होत आहे.निसर्गाचा तालमेल बिघडत चालला आहे.पावसाचा प्रामाण कमी झाला आहे.काही ठिकाणी तर दुष्काळ स्तिथी निर्माण झाली आहे.प्रदूषणात वाढ झाली आहे.वनातील प्राण्यांचे जीवन संकटात आले आहे.

झाडे हे आपल्या अस्तित्वासाठी खूप महत्वाचे आहेत कारण त्यांच्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला ऑक्सिजन मिळते आणि जर झाडंच नाही राहिली तर आपले जीवन संकटात येईल व आपल्याला भरपूर समस्यांना सामोरे जावे लागेल.

सरकार आणि काही संघटनांनीसुद्धा वृक्षतोड थांबवण्यासाठी अनेक उपक्रम आणि कायदे बनवले आहेत.सोशल मीडिया, शाळा,कॉलेज,रेडियो,टीव्ही यांच्या माध्यमाने लोकांमध्ये झाडं लावण्यासाठी आणि वृक्षतोड थांबवण्यासाठी जनजागृती केली जात आहे.आपण प्रत्येकाने वृक्षतोड थांबवले पाहिजे व नवीन झाडे लावली पाहिजेत.

Explanation:



Discussion

No Comment Found